स्वाध्याय
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या ?
उत्तर : कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला दुष्काळामुळे भेगा पडू लागल्या.
(आ) लोक शाहूमहाराजांविषयी काय बोलू लागले ?
उत्तर :- एवढा चांगला राजा मिळाला आणि अस्मानी संकट आलं
(इ) पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला ?
पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी विहिरीतील गाळ काढण्याचा आदेश दिला.
(ई) रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली?
उत्तर : रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशु संगोपन गृह योजना सुरू केली.
प्र. २. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) शाहूमहाराजांचा जीव वरखाली का होऊ लागला ?
उत्तर : प्रचंड दुष्काळ पडला. जनावर उपाशी पडली. माणसं जगण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागली. गोरगरीब भुकेने मरू लागले. त्यामुळे शाहू महाराजांचा जीव वरखाली होऊ लागला.
(आ) नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? त्या ठिकाणी परिस्थिती कशी होती ?
उत्तर नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांचा दौरा केला. तेथील शेती करपून गेली होती. पिण्यास पाणी नव्हते. खाण्यासाठी अन्न नव्हते. प्राणी भुकेने तडफत होते.
(इ) महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले ?
उत्तर : दुष्काळ असल्यामुळे जनता हैराण झाली आहे. धान्याच्या किंमती कमी करा. धान्याची विक्री खरेदी किंमत घेऊन करा. जेणेकरून प्रजा उपाशी राहणार नाही व तुम्हांला दुवा देतील. तुमचा तोटा दरबारात भरून दिला जाईल.
(ई) जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोई केल्या?
महाराजांनी गु्रांच्या छावन्या सुरु केल्या.त्यांना वैरण दानापानी याची सोय केली.सरकारी गायरान चरण्यासाठी मोकळीक दिली.
(3) महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले?
प्रजेकडे धान्य विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. म्हणून काम काढणं गरजेचे आहे, हे महाराजांनी ओळखले. म्हणून रस्ते बनविण्यात आले.
या साठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबविण्याचे ठरविले.
(ऊ) महाराजांनी शिशु संगोपनगृहं चालू करण्याचा हुकूम का दिला ?
कामावर येणाऱ्या बायकांची मुले झाडाखाली, इकडे तिकडे फिरतात. उपाशी मरतात. रडतात.त्यांची कोणीही काळजी घेत नाही.
ही गैरसोय टाळण्यासाठी महाराजांनी शिशु संगोपनगृहं चालू करण्याचा हुकूम दिला.
प्र. ३. खाली दिलेले शब्द वाचा व पुन्हा लिहा.
तल्खली,
अस्मानी,
हाहाकार,
संस्थान,
जित्राबं,
हद्द,
चिल्लीपिल्ली,
छावण्या,
हुकूम,
प्र. ४. या पाठामध्ये 'बिनव्याजी' हा शब्द आला आहे. तुम्हांला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा.
५. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) दुष्काळ x सुकाळ
(आ) सुपीक x नापिक
(इ) लक्ष X दुर्लक्ष
(ई) तोटा x नफा
(उ) स्वस्त X महाग
• खालील वाक्यांतील क्रियापदे अधोरेखित करा.
१. समीरने पुरणपोळी खाल्ली.
२. शाळा सुरू झाली.
३. मुलींनी टाळ्या वाजवल्या.
४. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले.
५. रमेशने अभ्यास केला.
६. वैष्णवी सुंदर गाते.
• कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्ये पूर्ण करा.
(लागला, गेले, सोडले, करतात.)
१. तिचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले.
२. एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात.
३. त्याने घर सोडले.
व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला.